नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताच्या दुर्गम भागात इंटरनेट सेवा पोहोचवण्याचे लक्ष्य साध्य केल्याचा दावा जिओ इंटरनेट कंपनीने केला आहे. जिओने उपग्रहामार्फत केबल विरहित इंटरनेट सेवा भारताच्या अतिदुर्गम भागामध्ये पोहोचवल्याचे सादरीकरण दिल्लीतल्या एका संमेलनात दाखवले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी यांच्याकडून नव्या प्रकल्पाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
'भारताच्या दुर्गम भागातही इंटरनेट सेवा'
जिओ इंटरनेट कंपनीचा सादरीकरणाद्वारे दावा
आकाश अंबानींकडून नव्या प्रकल्पाची माहिती
संमेलनात पंतप्रधान मोदींची उपस्थिती