Tuesday, July 02, 2024 09:10:36 AM

अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन

अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी: छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या आकस्मिक निधनावर टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना तीव्र धक्का बसला आहे. 'अनुपमा' मालिकेत त्यांनी काम केले होते.

९० च्या दशकात झी टीव्हीवर 'तोल मोल के बोल' हा रिॲलिटी गेम शो होस्ट करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऋतुराज सिंह यांनी टीव्हीवरील अनेक मालिका, चित्रपट आणि ओटीटी शोमध्ये काम केले होते. वर्ष १९९३ मध्ये झी टीव्हीवर त्याचा प्रसारित झालेला टीव्ही शो 'बनेगी अपनी बात'ही खूप गाजला. 'हिटलर दीदी', 'ज्योती', 'शपथ', 'अदालत', 'आहट', 'दीया और बाती', वॉरियर हाय', 'लाडो २' यांसारख्या मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री