मुंबई, १६ मे २०२४, प्रतिनिधी : मुंबईत सोमवार १३ मे रोजी घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळला. कोसळलेल्या फलकाखाली दबल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली. भावेश अटक टाळण्यासाठी पळून उदयपूर येथे गेला होता. तिथून पळ काढण्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.