Sunday, April 13, 2025 08:58:09 PM

लगीन माझ्या विठ्ठल-रुक्मिणीच

आज अवघी पंढपूर नगरी दुमदुमून निघाली. कारण पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला.

लगीन माझ्या विठ्ठल-रुक्मिणीच

पंढरपूर: आज अवघी पंढपूर नगरी दुमदुमून निघाली. कारण पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. मंगलाष्टका त्याच बरोबर देवा ब्राम्हणांच्या साक्षीने धुमधडाक्यात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली असून मोठ्या भक्तिमय वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे प्रथा: 

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका आहे. या संदर्भाने श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे दरवर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी सजावट केली जाते. विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो. तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा  सोहळा पार पडतो. लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात व दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात. आणि लग्न सोहळा पार पडला जातो. 

यंदाही या विठ्ठल रुक्मिणी लग्नसोहळ्यानिमित्त अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. त्याच बरोबर सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण देखील यावेळी पाहायला मिळाले. यावेळी भाविकांसाठी जेवणाच्या पंगतीचे आयोजन देखील करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा  विठ्ठल-रुक्मिणी लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. 


 


will the meeting between shinde and shah give a new turn to maharashtra politics
शिंदे आणि शाहांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळणार?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवारी आणि रविवारी झालेल्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आले आहे.

Ishwari Kuge

शिंदे आणि शाहांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळणार

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवारी आणि रविवारी झालेल्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा शाह यांची भेट घेतली. ही चर्चा तब्बल तासभर झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याविषयी तक्रार मांडली. अर्थखात्याकडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये असलेल्या मंत्र्यांच्या फायली वेळेत मंजूर केल्या जात नाहीत. यामुळे आमदारांच्या विकासकामांत अडथळे येत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे स्पष्ट केले.

यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद देत, 'महायुतीसाठी तुम्ही जे केले ते कधीच दुर्लक्षित केले जाणार नाही', असे म्हटले.

गोगावले यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून तात्काळ मुंबई गाठली:

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित राहिल्याने बैठकीचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे, ज्यामुळे शिंदे आणि शाह यांच्यातील खाजगी चर्चा आणखी गूढ बनली आहे. या बैठकीनंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले यांना मुंबईला तातडीने बोलावले. गोगावले यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून तात्काळ मुंबई गाठली, ज्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत नवीन सस्पेन्स निर्माण झाला आहे.

पालकमंत्रीपदावरून महायुतीत तिढा:

सध्या, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांवरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे. भरत गोगावले यांना रायगडची जबाबदारी दिली जाणार का? की आदिती तटकरे यांना पुन्हा संधी मिळणार? हे लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यानंतर ते लगेचच मुंबईत आले आणि त्यांनी या बैठका घेतल्यामुळे, महायुतीतील अंतर्गत समीकरणं पुन्हा बदलू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

महायुतीत कोणतीही धुसफूस नाही:

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'महायुतीमध्ये कोणतीही धुसफूस नाही', असं जरी वक्तव्य केलं असलं तरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सतत होणाऱ्या गुप्त बैठकांमुळे, अर्थ मंत्रालयाकडून येणाऱ्या तक्रारी आणि पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून येत असल्याचे संकेत आहेत. सध्या राजकीय वर्तुळांमध्ये एकच चर्चा रंगत आहे आणि ते म्हणजे, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या तक्रारीनंतर आता अर्थखात्याचं राजकारण तापणार का? आणि रायगडवर कोणाचा झेंडा फडकणार?' याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.